महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमध्ये महापुराची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत, रस्ते वाहतुकीचे संपर्क तुटले आहेत आणि अनेक गावे पूर्णपणे वेढली गेली आहेत.
अहिल्या नगर, शेगाव तालुक्यातील देवटाकळी या गावातही पूरस्थिती गंभीर झाली आहे. गावात जाण्याचे सर्व मार्ग पाण्याखाली गेल्याने बचावकार्य करणे कठीण झाले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले आहे.
एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके मिळून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरितांसाठी मोहीम सुरूच आहे.
या पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित राहण्याचे आवाहन केले आहे तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.




